मैत्री आहे तशीच असते…

आयोजन, योजनेशिवाय, नकळत होते ती मैत्री !…..मैत्री होणे, असणे आणि टिकणे कधी घडते? मित्र-मैत्रिणींना काय वाटते माझ्याबद्दल? असा प्रश्न कधीच मनात येत नाही ती मैत्री! स्वतःला प्रामाणिकपणे काय वाटतं? काय अनुभव येतो..तितकीच आणि तेवढीच मैत्री असते! मैत्री कधीच बदलत नाही, ती आहे तशीच असते! जी बदलते, ती मैत्री नसतेच कधी! […]

लाख मोलाची गोष्ट

आई-वडिलांची….सात पिढ्यांचा उद्धार करणारी एकुलती एक लाडाची लेक, त्यांच बावन्नकशी सोनं! हा ‘बी’…. घडवलेला दागिना आणि फक्त मुलगा म्हणून लहानपणापासूनच, दीड शहाणा लाडोबा असलेल्या दोघांचे दोनाचे चार हात केले की बहुतेक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात की काय?असा एक उगीचच झालेला समजं! एक दीड शहाणा आणि एक दुप्पट शहाणी असा साडेतीन […]

चैतन्यगीता….

विश्वातील सूक्ष्म घटक अणूरेणूंचे रहस्य उलगडण्यासाठी माणसाला हजारो वर्षे लागली. या विश्वाचा निर्माता आणि त्याच्या कृतींमागचा हेतू समजायला हजारो जन्म देखील कमी पडतील. मनुष्याची अल्पबुद्धी, अनेक शंकांनी विस्तारलेली आहे. या शंका, बुद्धी हे संभ्रम दूर करण्याचे काम अनेक अवतारांमध्ये भगवंतांनी केलेले आहे. यासाठी भगवंताच्या अवतारांमधील कृतींचा हेतू लक्षात घ्यायला हवा. […]

श्यामची आई….

श्यामची आई’ वाचली, समजून घेतली की किती सहज दैनंदिन काम, दिनचर्या, संसारात आलेल्या अडचणीतून, परिस्थितीतून श्यामला घडवत होती हे लक्षात येतं. ‘आईचा शाम ते श्यामची आई’ प्रवासच सांगतो की ही आंतरक्रिया किती परस्परपूरक होती. यासाठी आईच्या, यशोदेच्या नजरेतून श्याम पाहिला पाहिजे. थोर व्यक्तिमत्वसुद्धा सुरुवातीला अजाण बालक असते. त्यांचे हे बालपण […]

संग्रह कशाचा?….

कशासाठी ? अट्टाहास….खूप विशेष विशेष बनण्याच्या अट्टाहासात आपण शेष राहिलो आहोत का? साधारण आणखी अतिसाधारण गोष्टी शोधत गेलं की असाधारण असंच काहीतरी नक्कीच सापडणार ! ते शोधता आलं पाहिजे.बालपणी काडेपेटीची चित्रे, शिंपले, नदीतले गोटे, जाळी पडल्यावर छान दिसते ते पिंपळपान, मोरपीसं, वृत्त पत्रातील गाड्यांची चित्र वगैरे वगैरे….ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे….पण एकही […]

बगळ्या बगळ्या कवडी दे!….

माळावरची उडी दे….काय मागत होतो आपण? या बगळ्यांच्या थव्याकडे पाहून….कवडी की उडी… उंच उडणे, स्वातंत्र्य, कवेत निवांत निसर्ग की भौतिकतेला कवडी मोल ठरवून…आपले स्वआकाश तर मागत नव्हतो ना ! कावळ्यांची शाळा सकाळी भरतांना, संध्याकाळी सुटतांना, चिमणीला वारा घालून पाटी वाळवून द्यायची विनंती. घरातल्या कोपऱ्यात घरटं केल की मग तर तिची […]

लोकदेव….

“काळा पाषाण पण मंदिरासाठी घडवला आणि घाव सोसले की त्यात प्राण”. जुन्या मंदिरातील गाभाऱ्यात अद्भुत शक्ती असते. महाराष्ट्रात अश्या विविध शक्तींची मंदिरे खेड्यापाड्यात, छोट्या गावांमध्ये पुरातन काळापासून आहेत. यापैकी एक, महाराष्ट्राची लोकधारा जपणारे हे मंदिर, श्रद्धास्थान म्हणजे  खंडोबाची जेजुरी आहे. लोकांच्या हाकेला धावणारा, पावणारा लोकांचा देव म्हणून लोकदेव असेही म्हणतात.  […]

निसर्गाची नजरबंदी

निसर्गाची नजरबंदी….

एकीकडे उंच  डोंगर दुसरीकडे खोल दरी, नजरेसमोर  नागमोडी रस्ता…..सगळं नजरेआड होताना थंडगार थंड थंड झुळूक अंगाला लागली की मनाली आली  समजायचे. निसर्गाने खोल दरीपासून थेट क्षितिजापर्यंत बांधलेली इमारत हळूहळू ढगांपर्यंत पोहोचलेली दिसते. नजर जसजशी वर जाते तसेच तिथेच नजरबंदी करण्याची किमया, जादू म्हणजे मनाली. ह्या इमारतीचा पाया म्हणजे व्यास नदीचे […]

पाऊलवाट

पाऊलवाट….

अनुसया आक्काचे एक एक पाऊल संसारात पुढे, तर मनाला  विरक्ती आल्यामुळे तिचा घरधनी माणिक याचे दिंडीतून एक एक पाऊल कायमचे पंढरपूरच्या दिशेने पडत होते.“विठ्ठल विठ्ठल”, म्हणत म्हणत तो कधी विठ्ठलमय झाला तिला समजलेच नाही. अचानक एक दिवस सगळा संसार अर्ध्यावर सोडून कायमचा पंढरपूरला निघून गेला. कधीतरी मुलांची आठवण आली की […]

पावसाची झड

पावसाची झड

एकसारखी पावसाची झड सुरू होती…. अन् शेणानं सारवलेल्या अंगणात सात महिन्याच्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळून, खाली मान घालून बसलेली उर्मिला. ती वाहणाऱ्या पाण्याचा विचार करत होती. जमिनीवरच्या, डोळ्यातल्या की अंगाला चिटकून बसलेल्या जीर्ण लुगड्याला भिजवणाऱ्या माहिती नाही ! तिच्या मनात नेमके काय असते ? अजून तिला हालचाल न करता दिवस […]