माणूस

वादळ झेलुनी उभा राहतो जसा पर्वत,
घाव झेलूनी अधिक कणखर होतो माणूस।

अपयशाच्या राखेतून ठिणगी उजळते,
झुंज पुन्हा-पुन्हा देत प्रखर होतो माणूस।

कष्टांच्या भट्टीत तावून घडते सोने ,
दुःख स्वीकारता अधिक उजळतो माणूस।

अश्रूंच्या सागरातून मोतीच जन्मतो,
दुःख गिळुनीही हसत शहाणा होतो माणूस।

अपमानाच्या काट्यातून धीर उमलतो,
शब्द जखमेतूनही सजग होतो माणूस।

थेंब-थेंब साचुनी सागरच घडतो,
पडत-उठता अखेर स्थीर होतो माणूस।

ज्यांनी झुंज दिलीच नाही आयुष्याशी कधी,
त्यांना कुठे कळे काय समर होतो माणूस।

स्वप्नांच्या शिखरावर पोहोचायचे असेल,
खडतर मार्गानेच अमर होतो माणूस।

 

Varsha Karhad - Munde
Latest posts by Varsha Karhad - Munde (see all)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *